मराठी साहित्यातील अलौकिक प्रतिभेचे कवी, नाटककार आणि विनोदकार वैâ. राम गणेश गडकरी यांच्या जीवनपटाच्या पाश्र्वभूमीवर श्री. वि. स. खांडेकरांनी चितारलेले हे वाङ्मयात्मक, परंतु यथार्थ व्याqक्तचित्र आहे. हा मूळ ग्रंथ वैâ. गडकNयांच्या मृत्यूनंतर सुमारे बारा वर्षांनी १९३२ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाला. त्याची सुधारित आवृत्ती १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर पन्नास वर्षांनी, १९९७ मध्ये तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि आता या पुस्तकाचे पुनर्मुद्रण होत आहे, ते वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या सततच्या मागणीमुळेच. या ग्रंथात श्री. गडकNयांच्या सर्व प्रकारच्या साहित्याचे विस्तृत समालोचन असले, तरी प्राधान्याने त्यांच्या नाटकांवरच अधिक भर देण्यात आला आहे.