Ramai - Jivan Charitra Marathi Kadambari por Bandhu Manav História de vida de Ramabai Bhimrao Ambedkar (Ramai)
रमाई (कादंबरी) लेखक: बंधु माधव रमाईचे मोठेपण तिच्या पतीभक्तित पतीनिष्ठेत व पतीसेवेत सामावले आहे. साध्वी रमाईला संन्याशी होऊ घातलेल्या आपल्या पतीला, कर्तव्यनिष्ठ बनवण्यासाठी तिला तितकेच कर्तव्यकठोर बनावे लागले आहे. रमाई म्हणजे कठोर कर्तव्य निष्ठेचे मूर्तीमंत प्रतिक. तिच्या कर्तव्यकठोर निष्ठेतूनच भारत देशात ललामभूत असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा दैदीप्यमान सूर्य प्रकटला. रमाईच्यासारखी निस्वार्थी माणसं स्वतः अंधारात राहातात. प्रसिद्धीच्या प्रकाशात त्यांचं नाव फारच कमी झळकतं. पण त्यांचे सारे जीवन उदात्तेने, त्यागाने भरलेले असते. आजच्या आधुनिक युगातील स्री - मुक्ति चळवळीला रमाईची ही पवित्रगाथा अधिक स्फूर्तिदायी, अधिक बोधप्रद व अधिक क्रांती - प्रवण अशीच वाटेल, अधिक क्रांती - प्रवण अशीच ठरेल.