प्रत्येक मनुष्य हा शाश्वत सुख, शाश्वत आनंद प्राप्त करू इच्छितो. आणि त्या दृष्टीनेच तो सतत प्रयत्नशील असतो. परंतु तो कसा प्राप्त करावा हे मात्र त्याला समजत नाही. या शिवाय मानव जीवनाचा उद्देश भगवत्प्राप्ती वा ईश्वरप्राप्ती हाच होय असे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात. त्या सच्चिदानंदस्वरूप भगवंताची प्राप्ती करून घेतल्यानेच हा शाश्वत आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. परंतु ही ईश्वरप्राप्ती कशी करायची यासंबंधीचे ज्ञान आपल्याला नसते. तरी देखील येन केन प्रकारेण प्रत्येकजणच आपापल्या परीने यासाठी प्रयत्न करीत असतो. अशा साधकांसाठी प्रस्तुत पुस्तक मार्गदर्शन करू शकते.