असा हा कर्ण,भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवच-कुंडलं आपल्या पुत्रासाठी -अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती.परशुरामांनी,‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे‘तुझ्या रथाचं चक्र,भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण -पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता -पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर,सूर्यपुत्र!