आपल्या समाजाची असलेली आजची परिस्थिती ही अत्यंत दयनीय अशी आहे. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक, सर्व ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. त्यासमोर प्रत्येकालाच जावं लागतं. नचिकेत प्रकाशनातर्फे घेतलेल्या कथा स्पर्धेत सहभागी या कथा आहेत. स्पर्धेत सपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कथाकारांनी भाग घेतला होता. जवळपास 32 कथा आल्या होत्या स्पर्धेसाठी सर्वच विषयावरील कथांचा समावेश केला होता. वरील सर्व विषयावरील कथा या स्पर्धेसाठी आल्या होत्या. सर्वांनी सुंदर विषय निवडून उत्तम कथा सादर केल्या. भृणहत्येवरील 'जुळी' व 'आई' ला या जगात यायचयं!' तसेच 'नियती', 'जिहाद' या वर्तमान जगातील सध्याची परिस्थिती मांडणार्या कथा आहेत. 'अनामिका' 'प्रारब्ध' या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तिंवरील कथा. तसेच 'बोसे आणि ठोसे' व 'रमेशचा धिंगाणा' यात विनोदी पात्र असलेल्या कथा कथाकाराने रचल्या आहेत.
या सर्वच कथा वाचनीय आहेत. सर्व विषय वेगळे घेतले आहेत. संपूर्ण कथा एकत्रित करून मराठी कथा 2015 हा कथा संग्रह सादर केला आहे.