धीरुभाई अम्बानींनी स्वप्नपूर्तीच्या मार्गात आलेल्या अनंत अडथळ्यांवर मात करत ‘रिलायन्स’चं भव्य साम्राज्य उभारलं. धीरुभाई व रिलायन्सचं यश इतकं अपूर्व आहे, की बऱ्याच जणांना त्यांच्या संपत्तीच्या झगमगाटापलीकडचं पाहताच येत नाही. पण त्यांचं यश असं सहजी लाभलेलं नव्हतं. ते कष्टसाध्य होतं. या कहाणीतून वाचकांना केवळ स्वप्नं पाहण्याची स्फूर्तीच नव्हे, तर त्यावर पकड मिळवण्याचं धाडसही लाभेल. त्याचबरोबर प्रत्येक स्वप्नाची किंमत चुकवावीच लागते याची जाणीवही होईल.
ए.जी. कृष्णमूर्ती (अच्युतानी गोपाल कृष्णमूर्ती) यांनी आंध्र प्रदेश विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली. 1968 मध्ये त्यांनी ’कॅलिको मिल्स’मध्ये नोकरीला सुरुवात केली. 1980मध्ये एक क्लायन्ट आणि पस्तीस हजार रुपये या भांडवलावर त्यांनी ’मुद्रा कम्युनिकेशन्स’ची मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या नऊ वर्षांत ती भारतातली तिसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी जाहिरात एजन्सी बनली. ’मुद्रा कम्युनिकेशन्स प्रा.लि.’चे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कृष्णमूर्तींची ओळख निर्माण झाली. त्यांच्या एजन्सीकडे असलेले दोन प्रमुख ब्रँड्स म्हणजे ’विमल फॅब्रिक्स’ आणि ’रसना सॉफ्ट ड्रिंक कॉन्सन्ट्रेट.’ त्यानंतर आणखी बरेच भारतीय ब्रँड्स त्यांच्या एजन्सीकडे आले. तेवीस वर्षांच्या कार्यकालात या एजन्सीला 844 पुरस्कार लाभले. त्यामध्ये कित्येक राष्ट्रपती पुरस्कारांचा समावेश आहे. ’मुद्रा’ने सलग दहा वर्षं ’द एजन्सी ऑफ द इअर’ पुरस्कार पटकावला. सन 2000मध्ये त्यांनी जाहिरात क्षेत्रासाठी स्ुग्ह्ग्.म्दस् हे पहिलं ऑनलाइन संदर्भ ग्रंथालय सुरू केलं. कृष्णमूर्ती यांनी इंग्रजी आणि तेलुगू भाषेत स्तंभलेखन केलं. त्यांची इंग्रजीमध्ये चार आणि तेलुगूमध्ये नऊ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. ’एजीके ब्रॅन्ड कन्सल्टिंग’चं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.
कोल्हापूर येथे वास्तव्य असलेल्या सुप्रिया वकील यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग व वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका प्राप्त केल्या आहेत. आकाशवाणी, दूरचित्रवाणी व साहित्य या तिन्ही माध्यमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सध्या त्या स्वतंत्र लेखन व अनुवाद या क्षेत्रांत कार्यरत आहेत.
कोल्हापुरातील स्थानिक दूरचित्रवाहिनीवर ’वृत्तनिवेदिक’ म्हणून 13 वर्षे काम केले तसेच त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री आहेत. विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
’मैफल’ व ’उत्सव’ हे काव्यसंठाह आणि ’पॉपकॉर्न’ या ललितगद्य संठाहासह त्यांचे भारतीय व परदेशी लेखकांच्या इंठाजी साहित्यकृतींचे मराठी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. (ज्यामध्ये हिलरी क्लिंटन, अरुण शौरी, जेआरडी टाटा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, किरण बेदी, खुशवंतसिंग, तसलिमा नसरीन, चेतन भगत इत्यादी मान्यवरांच्या साहित्याचा समावेश आहे.)
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ’स्वामी’कार रणजित देसाई उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांचा उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती पुरस्कार, ’तुका म्हणे’ पुरस्कार, आशीर्वाद पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा विशेष पुरस्कार. ’युवा गौरव’ पुरस्कार, पत्रकार पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे.