उपराकार लक्ष्मण माने यांच्या षष्ठब्दीपूर्ती निमित्त संपादन केलेला हा गौरवग्रंथ. यात माने यांना अगदी तरुणपणापासून ते आजतागायत ज्या ज्या सहकाऱ्यांनी चळवळीत साथ दिली, त्या लोकांनी लिहिलेले लेख आहेत. यातील लेखांवर सहज नजर फिरवली तरी लक्ष्मण माने यांचा स्नेहीमंडळींचा गोतावळा कसा विस्तृत होता, हे लक्षात येते. तसेच सामाजिक किटाळ सहन करूनही त्यांची लेखणी थांबली नाही, हेही दृष्टीस पडते. डॉ. बाबा आढाव, खा. डॉ. जनार्दन वाघमारे, अरुण खोरे, प्रा. रामनाथ चव्हाण, नारायण जावलीकर, डॉ. एकनाथ आव्हाड, डॉ. जयसिंगराव पवार या मान्यवर सहकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी शशी माने यांचा लेखही यात आहे. भटक्या विमुक्त लोकांना एकत्रित करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या चळवळी, मोर्चे, संघर्ष त्यातला सच्चेपणा याला उजाळा देणाऱ्या आठवणी यांत पाहायला मिळतात. तसेच प्रत्येकाच्या जीवनजाणिवा समृद्ध करून मानवता निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे, हे दिसून येते.
LAXMAN BAPU MANE IS A MARATHI WRITER AND A SOCIAL ACTIVIST FROM MAHARASHTRA, INDIA. MANE CAME TO SUDDEN FAME AFTER PUBLISHING HIS AUTOBIOGRAPHY UPARA, (AN OUTSIDER), IN 1980. UPARA WAS CONSIDERED AS A MILESTONE IN MARATHI DALIT LITERATURE AND RECEIVED SAHITYA AKADEMI AWARD IN 1981 AND PADMA SHRI IN 2009. HE IS A FORMER MEMBER OF MAHARASHTRAS LEGISLATIVE COUNCIL.
लक्ष्मण बापू माने हे महाराष्ट्रातील एक मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 1980 मध्ये त्यांचे आत्मचरित्र उपरा प्रकाशित केल्यानंतर माने यांना अचानक प्रसिद्धी मिळाली. उपरा हे मराठी दलित साहित्यातील मैलाचा दगड मानले गेले आणि त्यांना 1981 मध्ये साहित्य अकादमी आणि 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाले. ते महाराष्ट्राचे माजी आमदार आहेत.