"सत्याग्रहाची विलक्षण देणगी महात्माजींनी देशाला दिली. महात्माजींच्या सत्याग्रही तंत्राचा पूर्ण विकसित अविष्कार १९३० सालच्या सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात दिसला. याची अखेर महात्माजींच्या कल्पनेतले ‘लोकराज्य' सोलापूरात अस्तित्वात येण्यात झाली. चाणाक्ष साम्राज्यसत्तेने यामधला धोका ओळखत सोलापूरात मार्शल लॉ जारी करून तब्बल एकोणपन्नास दिवस राबवला.
सोलापूरात जे घडले ते सोलापूरबाहेर कधी आलेच नाही. खुद्द महात्माजींना व त्यांच्या अनुयायांना आपल्या सत्याग्रही तंत्राचा हा विजय अखेरपर्यंत समजला नाही. समज गैरसमजाच्या या कल्लोळात सोलापूरच्या लढ्याबाबतची तमाम भारतीयांची धारणा ही सिसेरोच्या वरील वचनाप्रमाणे राहिली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णपान ठरावे अशी ही घटना सजगपणे नोंद न झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत गेली.
सोलापूर मार्शल लॉ १९३० या पुस्तकात या अज्ञाताचा शोध घेतलेला आहे.
ANIRUDH BIDVE HAS COMPLETED M.COM, MA, LLB AND IS WORKING AS DEVELOPMENT OFFICER IN LIC. HE HAS CONTRIBUTED MORE THAN TWO HUNDRED ARTICLE IN VARIOUS PRETIGIOUS NEWSPAPERS IN MAHARASHTRA. HE IS A PUBLISHED AUTHOR OF HISTORICAL BOOKS LIKE BAKHAR RAVRAMBHACHI, EK MAHARASHTRA & SHIVTRIDAL.
"अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम,एम ए, एल एल बी असे शिक्षण घेतलेले असून ते एल आय सी मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रामधील आघाडीच्या वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतून तसेच वेब पोर्टल वरुन त्यांनी दोनशेहून अधिक इतिहासविषयक लेखांचे लेखन केलेले आहे. ‘बखर रावरंभाची’ व ‘ऐक महाराष्ट्रा’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. शिवशाहीपूर्व व शिवशाहीकालीन इतिहासावरील; ‘शिवत्रिदल’ या प्रकल्पाचे सध्या लेखन सुरु असून गुरुवर्य सेतुमाधवराव पगडी यांना अनुसरत ‘NO DOCUMENT, NO HISTORY’ या दंडकानुसार त्यांचा आजवरचा लेखनप्रवास चाललेला आहे."