माणसाचे निसर्गाशी जन्मत:च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती.