आपले हात महर्षी वाल्मीकींच्या हातांतून सोडवून घेत व्याध निषाद उत्तरला ``मुनिमहाराज, तुम्हाला ‘उ:शाप’ द्यायचा असेल, तर तो एवढाच द्या... तुमच्या या महाकाव्यात राम सीतेचा त्याग करीत नाही, असं दाखवा!''``मित्रा, रामकथा ही सत्यकथा आहे. ती बदलता कशी येईल?''``मग... तुमच्या या काव्यात रामानं सीतेला टाकल्यावर तिची नि त्या क्रौंचपक्षिणीची भेट होते, असं दाखवा.''``ती कशासाठी?''``सीतेला त्या दु:खी पक्षिणीची समजूत घालू दे.`तू माझ्यासारखीच दुर्दैवी आहेस आणि तुझा पती रामाइतकाच दुर्दैवी आहे,' असं सीता तिला सांगू दे.'..बोलताबोलता व्याध खाली उतरला आणि चालू लागला.