PRINT EDITION II DETAIL :
TITLE : - Ranjak Vaidic Ganit LANGUAGE :- Marathi
SIZE : - 7 inch by 9 inch PAGES - 144
BOOK PRICE : - 150 Rs. DISCOUNT - 25 Rs
NET BOOK PRICE :- 150 Rs - 25 Rs = 125 Rs
AVAILABILITY : - All over Maharashtra.
For bulk order - contact to author
_______________________________________
RANJAK VAIDIC GANIT
LIST of BOOK DISTRIBUTOR
_________________________________________
~~~~~~~ PUNE ~~~~~~~
1) Shabdangan Ground Floor, Maharashtra Sahitya Parishad, Tilak Road, Pune.
2) CHINMAY ENTERPRISES (Wholesale Distributor)
40, Budhawar Peth, Vishveshwar Society, ABC Chowk, Pune
5) Book Ganga / International Book House Deccan, Pune.
To order book online refer https://tinyurl.com/yc5mkjn2
~~~~~~~ MUMBAI ~~~~~~
1) IDEAL BOOK DEPOT
Narayan Smruti, Chhabildas Road, Dadar West, Mumbai.
2) BOOK POINT
Shop No 5, Keshav Bhavan, J P Road, Andheri West, Mumbai.
~~~~~~~~~~~~~~ NANDED DISTRICT ~~~~~~~~~~~~~~~
1) DEBADWAR PUSTAK BHANDAR
Bhore Complex, Mahaveer Chowk, Nanded.
Note to Reader :
You can post suggestion , constructive criticism to improve book or any question related to any topic at
https://www.facebook.com/vjsmathemagic OR
https://www.facebook.com/groups/887201061336628/
Group on mathematics for solving reader's doubt, spreading new insight in mathematics by different experts, bringing different researcher together, boosting number sense / logical thinking in students.
************************************************
रंजक स्पर्धा गणित Released
Refer :- http://tinyurl.com/kc5ufsc
Unique book to master numeracy. Suitable for student appearing to competitive exams like STI , PSI, 10th, 12th, Bank Probationary officer, SBI PO etc.
Related Videos / Presentations
1) https://www.youtube.com/watch?v=b3PFjsUgULM
2)http://www.slideshare.net/jadhavvitthal1989/presentations
Note to Reader :
You can post suggestion , constructive criticism to improve book or any question related to any topic at
https://www.facebook.com/pages/Ranjak-Vaidic-Ganit/1462686490685354
Or on Google play. All drawback will be removed in next editions.
*********************************************************** OTHER THOUGHTS
******************************************************
1) "Each and every activity in past are like dots,
Genius artist connect it wisely to make better picture.
2) Giving time, respect, better price to others work or services
or bringing thought reform in society is best social work.
Exploiting by one hand, giving it by other hand is no social work.
3) Wealth is creation of brain.
4)
CONSCIOUSNESS EFFECT
Wound, hunger, thirst, betrayal etc doesn't hurt more to person,
But consciousness of it increases pain.
Consciousness is the entity which increases intensity of emotion like
pain, anger, worry, love, hate etc.
Engaging brain in other activity reduces intensity of pain.
5) " Life is like mathematics, with full of problems
Once you solve problem, you become more expert
Once you become expert, you enjoy solving problem,
Once you enjoy problem, you demand more problems of all type.
No matter wherever one goes, there will be problems (opportunity)
One who loves to solve problem is real mathematician"
The path that leads to maximum piece of mind and helps
ones to achieve desired perception is optimum path."
--- V.B. Jadhav
******************************************************
शिक्षण (Sample Thoughts on education)
शिस्तबध्दरीतीने मानवाच्या नसानसांत असणाऱ्या शक्ती व क्षमतांची ओळख करून देवून मानवाला सर्वांगीण उन्नतीकडे नेणारा मार्ग म्हणजे शिक्षण’.
शिक्षण म्हणजे केवळ उपजीविकेसाठी केलेला कोर्स किंवा चालवलेला खटाटोप नसतो किंवा शिक्षण ही काही शाळा व कॉलेजांची मक्तेदारी नाही.
(खरेच बहुतांशी कॉलेजांतून जे मिळते ते शिक्षण असते का ? हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होईल)
शिक्षण म्हणजे मानवाला उन्नत बनवणारा मार्ग. ते संवादातून, अनुभवातून, चिंतनातून, श्रवणातून, अवलोकनातून, विलोकनातून, निरीक्षणातून, देवाण-घेवाणीतून, संस्कारातून, स्पर्शातून, कृतीतून, सरावातून इत्यादींतून घडते.
खरेतर हे विश्वच खिडक्या व दारे नसलेली शाळा आहे व आपण त्यात निरंतर शिकणारे विद्यार्थी असतो. फरक एवढाच की परंपरागत शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी हे साक्षर असतात. त्यांना अक्षरांची तोंड ओळख असते. तर वैश्विक शाळेतून शिकणारे , ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी हे सुशिक्षित असतात. या शाळेत जो शिकतो तोच खऱ्या अर्थाने शिकतो व तोच स्वतःच्या ध्येयापर्यंत पोचण्याची, स्वाभिमानाने स्वतंत्र आयुष्य जगण्याची क्षमता बाळगतो. अशाच व्यक्तीला स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतांची जाण होते. त्या अर्थाने व्यक्तीचे खरे शिक्षण हे शाळा, कॉलेजातून बाहेर पडल्यावर सुरू होते.
ज्यांनी शाळा, कॉलेज अटेंड केली नाहीत त्या व्यक्ती असुक्षित असतातच असे नाही. एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ही त्याच्या कागदी सर्टिफिकेट अथवा ग्रेडवरून, एक- दोन तासांच्या संवादातून किंवा वरवर वाटणाऱ्या बाह्यरूपावरून कळतेच असे नाही. सर्व शाळा कॉलेजात गेलेले साक्षर सुशिक्षित असतातच असे नाही व शाळा कॉलेजात न गेलेले निरक्षर असुशिक्षित असतातच असे नाही. साक्षर म्हणजे सुशिक्षित व निरक्षर म्हणजे असुशिक्षित नव्हे. केवळ साक्षर होणे महत्त्वाचे नाही तर सुशिक्षित होणे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे मूर्ख साक्षर व्यक्तींनी व समाजाने निरक्षर व्यक्तींकडे पाहण्याचा दॄष्टीकोण बदलावा व त्यांनादेखील माणूस म्हणून समृध्द आयुष्य जगण्याची संधी द्यावी. त्यांनादेखील विकासाच्या / ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत सामील करून घ्यावे. कारण प्रत्येक व्यक्तीजवळ ज्ञानाचा अमर्याद साठा असतो , जो व्यक्तीला अनुभवातून, निरीक्षणातून व व्यावहारिक जगाच्या खाचखळग्यातून जाताना भोगाव्या लागणाऱ्या दुःखातून / यातनांतून मिळालेला असतो.
तसेच शाळा, कॉलेजात न गेलेल्या व्यक्तींनी स्वतःस निरक्षर मानून न्यूनगंड बाळगू नये किंवा दोन – चार अक्षरे वाचता आली नाही म्हणून इतरांकडून होणारी मानहानी, शोषण वा अन्याय कदापि सहन करू नये. स्वतःच्या शारिरीक श्रमांचे अथवा सेवांचे नेहमी योग्य मूल्यमापन करायला अशा व्यक्तींनी विशेषतः शेतकरी, मजूर, कारागीर यांनी शिकलेच पाहिजे व स्वतःच्या सेवांची किंमत ठरवण्याचा अधिकार इतर व्यक्तींच्या हातात, शासनाकडे वा कारखानदारांकडे कदापि देवू नये. दलाल वर्गांचे प्रस्थ कमी करून थेट ग्राहकांपर्यंत सेवा / माल पुरवण्यातच आपला न्याय दडलेला आहे, हे या समाजाने कदापी विसरू नये.
जोपर्यंत या समाजाच्या अपेक्षा उंचावणार नाहीत, हा समाज स्वप्न पाहायला शिकणार नाही, समस्यांची चार हात करायला शिकणार नाही , जोपर्यंत या समाजात सद्सदविवेकबुध्दी जागे होणार नाही ;
तोपर्यंत ‘स्वतःच्या मालाची / सेवांची / उत्पादनांची’ योग्य किंमत काय ? हे या समाजाला कधीच समजणार नाही. ज्या दिवशी हा वर्ग संघटीत होवून स्वतःच्या सेवांचे मूल्यमापन करायला शिकेल , सहकारातून भांडवल उभारणी करून कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून दलाल वर्गाचे प्रस्थ टाळून ग्राहकास विकायला शिकेल तेव्हाच या वर्गाचे राहणीमान, एकूण जीवनाचा दर्जा उंचावेल, तेव्हाच शेतीत व इतरत्र तंत्रज्ञानाचा वापर शक्य होईल व देश खऱ्या अर्थाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. त्याचवेळी आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत स्वतःस सिध्द करण्यास सज्ज होवू. त्याचवेळी श्रमास खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळेल व बोकाळलेला चंगळवाद कमी होईल. तसेच ग्राहकांचे हितदेखील प्रत्यक्ष उत्पादकांकडून वस्तू / सेवा खरेदी करण्यातच असते, हे आपण कदापी विसरू नये. कंपन्यांनी / उत्पादकांनी या दिशेने पावले उचल्यास ग्राहकांस वस्तू कमीत कमी किंमतीत मिळतील. यातूनच महागाई कमी होईल. यातूनच सर्वांना (दलाल वर्ग सोडून) योग्य न्याय मिळेल.
यातूनच श्रमाला व प्रत्यक्ष सेवानिर्मिती करणाऱ्या व्यक्तींना आदर / प्रतिष्ठा मिळेल व समाजातील विविध वर्गांतील आर्थिक दरी कमी होण्याची संभाव्यता वाढेल.
यातूनच आपण श्रमप्रतिष्ठेवर आधारलेला समाज उभा करू शकू.
यासाठी आपणांस साक्षर व्हावे लागेल,
यासाठी आपणांस शिक्षण घ्यावे लागेल
आपणांस बाजारपेठांचे शिक्षण, आर्थिक उलाढालींचे शिक्षण, मालाची गुणवत्ता सुधारण्याचे शिक्षण, भांडवल उभारण्याचे शिक्षण, माणसे जोडण्याचे शिक्षण, स्वतःच्या सामर्थ्यांची जाण करणारे शिक्षण , नियोजनाचे शिक्षण, पिकांचे संरक्षण करण्याचे इत्यादि प्रकारचे शिक्षण घ्यावेच लागेल.
विठ्ठल जाधव
__________________________________________________________________
मार्गदर्शक लेख
गणित म्हण्जे काय ? गणिताचे महत्व काय आहे ?
स्पर्धा परिक्षांसाठी गणिताचा अभ्यास कसा करावा ?
गणित अध्ययनाच्या चुकीच्या पध्दती कोणत्या ?
---
गणित म्हणजे सत्य नव्हे ; पण सत्यापर्यंत पोहचवणारे शास्त्र म्हणजे (तर्कशास्त्र) गणित !
काय योग्य- अयोग्य, चूक-बरोबर , खरा इतिहास -खोटा इतिहास इत्यादी ठरवण्यासाठी लागणारे मुलभूत निकष देण्याचे कार्य गणिताचे (तर्कशास्त्राचे).
गणित हा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आधारस्तंभ आहे.
गणित म्हणजे केवळ आकडेमोड नाही किंवा पाठांतर केलेल्या सूत्राचा वापर करून विशिष्ट प्रकारचे स्पर्धा परिक्षांतील प्रश्न सोडवणे नव्हे तर गणित म्हणजे काही स्वयंसिध्द मुलभूत संकल्पनांच्या आधारे अनिश्चित प्रश्नांचा अथवा रहस्यांचा तर्काचा वापर करून उलगडा करणे.
गणित ही मानवाने विकसित केलेली वैश्विक भाषा आहे.
गणित हे शास्त्रांचे शास्त्र आहे.
हाती असलेल्या साधनांचा / ज्ञानाचा वापर करून तर्कसुसंगत विचारसरणीच्या साहाय्याने इच्छित ध्येयापर्यंत पोहचणे म्हणजे गणित.
ज्याला गणिताचा हा खरा अर्थ उलगडतो व जो केवळ स्पर्धा परिक्षांच्या नव्हे तर आयुष्याच्या अनुषंगाने गणित / तर्कशास्त्र शिकतो, तोच आयुष्याचे गणित सोडवू शकतो.
जवळ-जवळ सर्वच क्षेत्रांत गणित डोकावते.
उदा. एखाद्या उत्कृष्ट लेखकाचा एखादा लेख निवडा व त्यातील कोणत्याही परिच्छेदाचे
निरीक्षण करा, त्यात लगतची वाक्ये आपणांस तर्कशास्त्रीय दृष्टीकोनातून
सुसंगतपणे माडलेली आढळतील.
गणित अध्ययनाच्या चुकीच्या पध्दती
1) SI = P * R * N / 100
P= (SI * 100 ) / (R * N)
R= (SI * 100 ) / (P * N)
N= (SI * 100 ) / (P * R)
हे चारही सूत्रे पाठ करणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे .
योग्य पध्दत
येथे SI = P * R * N / 100 हे एकच सूत्र लक्षात ठेवणे पुरेसे ठरते.
तसेच गणितात कोणतेही सूत्र पाठ करायचे नसते, तर ते समजून घ्यायचे असते.
उदा. SI = P * R * N / 100 हे सूत्र असेच का ?
नेहमी स्वतःस का ? , कसे ? याप्रकारचे प्रश्न विचारा.
पण आपले दुर्दैव हे की आपणांवर बालपणापासून
'गणित खूप अवघड असते ' या विचारांचा इतरांकडून
(अथवा शिकवणी घेणार्या शिरोमणींकडून) भडीमार होतो.
कालांतराने आपणदेखील तेच मानतो.
मुळातच गणिताचे अज्ञान - त्यात शिकवणीत चुकीच्या पध्दतीने शिकवले जाणारे गणित (?)
यामुळे विषय अधिकच अवघड बनतो. आज बहुतांश शिकवणी वर्गांत आपणास चुकीचे गणित शिकवले जाते. आणि मजेची गोष्ट ही की - 'आपण चुकीचे गणित शिकतोय' याचे जाणीवदेखील आपणास नसते. जर आपणास "गणित म्हणजे काय अथवा योग्य गणित कोणते ?" हेच माहित नसेल तर 'आपण चुकीच्या पध्दतीने गणित शिकतोय का योग्य पध्द्तीने' हे कळेल तरी कसे ? एखाद्या व्यक्तीचे शोषण होतेय , पण त्याला त्याची जाणीव नसेल तर अन्यायाविरूध्द लढण्याचा प्रश्नच येत नाही ? (यालाच तत्वज्ञानाच्या भाषेत Prototype Paradox / Life Paradox म्हणता येईल.) येथे आपण न लढण्याबद्द्ल त्या व्यक्तीला दोषी ठरवू शकत नाही. मग त्यास दोषी कधी ठरवता येईल ? ज्यावेळेस त्या व्यक्तील होणार्या अन्यायाची जाणीव होवूनही तो / ती निमूटपणे अन्याय सहन करत असेल त्यावेळेस. तर असो, सांगायचा उद्देश- गणित चुकीच्या पध्दतीने शिकण्यात विद्यार्थ्यांचा दोष नसतो तर तो 'चुकीचे गणित' शिकवणार्या शिक्षकांचा अथवा व्यापारी तत्वांवर केवळ शंख-शिंपले (पैसे) गोळा करण्यासाठी काढलेल्या पुस्तकांचा असतो.
ज्या समाजातील अधिका-अधिक व्यक्ती या पैशाच्या पुढे जावून एका उदात्त दृष्टीकोनातून सेवांची निर्मिती करतात, इतरांना समजून घेवून त्यांना उन्नत बनवतात, सर्जनशीलतेला चालना देतात, वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून काळाच्या पुढे धावण्याचा प्रयत्न करतात , तो समाज खर्या अर्थाने पुढे जातो. अन्यथा एका मुखाने जगाला पर्यावरणाचे रक्षण करा' असे सांगायचे व दुसर्या बाजूने मात्र पर्यावरणास हानी पोहचवणार्या अनावश्यक वस्तूंचे अवाजवी प्रमाणात केवळ अधिकाधिक अर्थार्जन व्हावे या हेतूने उत्पादन वाढवण्यात खरेच शहानपण आहे का ? व्यवहारातील बर्याच वस्तू एकमेकांत शेअर केल्यास पर्यावरणाची होणारी अपरिमीत हानी टाळता येईल , उत्पादनासाठी लागणार्या वेळेचा अपव्यय टाळता येईल व त्याच वेळेचा इतर नवीन सेवांची निर्मिती करण्यासाठी सदुपयोग करता येईल ; पण आज मानवास प्रत्येक वस्तू स्वंतंत्रपणे स्वतःच्या मालकीची हवी आहे. त्यातूनच वस्तूंची अवास्तव मागणी वाढते व मागणीच्या अनुषंगाने पुरवठा वाढतो. त्यातल्या त्यात आज देखील कोट्यावधी व्यक्तींना स्वतःच्या अस्तित्वासाठीच व दोन वेळ्च्या पोट्याच्या प्रश्नासाठीच लढावे लागत असेल तर काय योग्य वा काय अयोग्य याचा विचार करण्याचा वेळच तरी कोठे असतो. त्यातल्या त्यात स्वतःच्या धुंदीतच आत्ममग्न झालेल्या सधन / सुशिक्षित समाजाला देखील या समाजाकडे पाहण्याचा वेळच तरी कुठे आहे ? भावी काळात कदाचित समाजाला जागृत करण्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. आपण ज्या समाजातून / ज्या भागातून पुढे आलो त्या समाजाच आपण काही तरी देणं लागतो, ही भावना कधीही विसरू नये. पण म्हणून केवळ आपल्याच भागाचा इतरांकडे डोळेझाक करून विकास करणे अथवा केवल स्वतःचीच खळगी भरण्याचा प्रयत्न करणेदेखील चुकीचे. विकास करावा मात्र तो समतोल करावा. विकासाचे विकेंद्रीकरण करावे.
सांगण्याचा उद्देश विद्यार्थ्यांनी योग्य पध्दतीने गणित शिकण्यासाठी ते योग्य शिक्षकांकडून अथवा पुस्तकांतून शिकावे, स्वतःची पुस्तके इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करावे त्यातूनच कागदाचा अपव्यय टळेल व दरवर्षी कोट्यावधी वृक्षांना वाचवता येईल. शक्य असल्यास डीजिटल इबुकचा वापर करावा. मुळात गणित हा खूपच सोपा विषय आहे. गणित विषयाचे सौंदर्य म्हणजे यात इतर विषयांप्रमाणे यात जास्त लक्षात ठेवावे लागत नाही. येथे केवळ मुलभूत नियम लक्षात ठेवावे लागतात व त्यांच्या साहाय्याने प्रश्नाची उकल काढण्यासाठी 'तर्काचा वापर कसा करायचा ?' हे शिकावे लागते.
*************************************************
Vitthal B. Jadhav is Indian Mathematician , Lyricist, Poet, Practical Philosopher. He is inventor of many mathematical theorem / methods such as VJ's Golden Lemma , VJ's Matrix Method (one line method for solving equation & computing n'th root of real number), VJ's Cross Divisibility Test, Indian Fractional Decimal System (novel concept for advancement of decimal number system), Sliding Ruler Multiplication, Two Step Method for Quick Squaring etc..
He spent most of his life in pursuit of understanding mathematics , its beauty , philosophy. He is also classical lyricist & written plenty of classic song including
"Tiranga Tiranga Tirang Hu Main" .
(refer https://www.youtube.com/watch?
Invented three new form of poetry / figure of speech called as
"Vyutkram (Reverse)", "Cyclic", "Polygonic"
To follow on facebook refer
https://www.facebook.com/