समर्थ रामदासांची ही जीवनगाथा. जांब या गावातील त्यांचं बालपण, लहानपणापासूनच नदीशी, रामरायाशी, हनुमंताशी जडलेलं नातं, प्रत्यक्ष रामरायाने, हनुमंताने त्यांना दिलेला अनुग्रह, लहानपणापासूनच व्यायामाबद्दल त्यांना असलेलं प्रेम, त्यांची अखंड साधना, पुरश्चरण, बलोपासना, हिंदू धर्माऱ्यारक्षणासाठी ठिकठिकाणी स्थापिलेली मारुती मंदिरं, मठ, युवकांना संघटित करून, रामनवमी, हनुमानजयंतीसारऱ्याउत्सवातून अंगीकारलेली समाजाभिमुखता, शहाजी राजे आणि शिवाजी राजांशी असलेला अनुबंध, चाफळ येथील रामंदिराची स्थापना, शिवथर घळ येथे झालेली दासबोधाची निर्मिती, त्यांनी भारतभर केलेलं भ्रमण, सज्जनगडावरील त्यांचं वास्तव्य, त्यांचा शिष्यपरिवार आणि शेवटी सज्जनगडावर त्यांचं रामरूपात विलीन होणं...असा हा रामदासांचा जीवनप्रवास ओघवऱ्याभाषेत शब्दबद्ध केला आहे.
MRS. MANJUSHRI GOKHALE HAS COMPLETED HER MASTERS IN MARATHI LANGUAGE ALONG WITH B.ED. IN MARATHI AND HINDI. SHE HAS TEACHING EXPERIENCE IN COLLEGES AND HAS DELIVERED VARIOUS LECTURES ON ‘SAINT LITERATURE’ IN NUMBERS OF CITIES. HER ARTICLES AND RESEARCH WORK HAS BEEN PUBLISHED IN VARIOUS NEWSPAPERS. A TOTAL OF 30 BOOKS PUBLISHED. VARIOUS AWARDS ARE WON BY HER NOVELS AND STORIES AND BOOKS. HER BOOK ‘TUKAYACHI AVALI’ NEEDS A SPECIAL MENTION AS IT IS DECLARED THE BEST NOVEL IN VARIOUS CITIES AND HAS WON PRESIDENT’S AWARD, AND IS ALSO A PART OF THE CURRICULUM OF MASTERS’ DEGREE FOR ARTS.
इचलकरंजीतील द मॉडर्न हायस्कुलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून, तर कोल्हापूरमधील महाराष्ट्र हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळला आहे. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, पाकशास्त्र, प्रवसावर्णन वगैरे वेगवेगळ्या साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची २५ पुस्तके प्रकाशित आहेत. शिशिरसांज, रानगंध या नावाने त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. फुलपाखरांचा गाव आणि आकृतीगंध ही दोन चारोळ्यांची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. स्वस्तिकाची फुले, हास्यमेव जयते, बुफे आणि फेफ आणि ओंजळीतले मोती या कथासंग्रहांचे त्यांनी लेखन केले आहे. अंधाराच्या सावल्या, अग्निलाघव या रहस्यकथासंग्रहाबरोबरच रंगपश्चिमा हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध झाले आहे. फास्ट-ब्रेकफास्ट नावाचे पाककृतींवर आधारित पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. अमृतसंदेश माहात्म्य या आध्यात्मिक पुस्तकाच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी सासूची माया या मराठी चित्रपटासाठी कथा-पटकथा व संवादलेखनही केले आहे. अरुण दाते यांचा शुक्रतारा आणि शब्दसुरांच्या झुल्यावर या कार्यक्रमांमध्ये त्यांनी निवेदन केले आहे. तुकयाची आवली या कादंबरीला २००८मध्ये तुका म्हणे पुरस्कार आणि भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील वाचनवेध पुरस्कार जोहार मायबाप जोहार या पुस्तकाला खामगाव येथील कै. वरणगावकर स्मृतिपुरस्कार २०१२, संत गाडगेमहाराज अध्यासन पुरस्कार २०१४, तसेच ज्ञानसुर्याची सावली या कादंबरीला अश्वमेध ग्रंथालय आयोजित अक्षरगौरव पुरस्कार २०१४, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे किर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पारितोषिक २०१६ मिळाले आहे. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या वर्षातील सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा अशोक देवदत्त टिळक पुरस्कार समर्पण या संत जनाबाई यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरीस जाहीर.