आपण आपल्या आयुष्यातील सह्याद्रीभ्रमण गाथा “दुर्गयात्री” म्हणून प्रसिद्ध करत आहात आणि या यात्रेची प्रस्तावना आपण माझेकडून मागितली याबद्दल मला स्वतःचाच अभिमान वाटला....
पृथ्वी आणि सूर्य यांच्या धुंद मिलनातून जन्माला आला सह्याद्री. सूर्याच्या रखरखत्या वीर्याचा हा आविष्कारही तितकाच कणखर, राकट, तापट ऐसा दिसतो आहे. जसा काही काळाकुट्ट रामोशीच! सूर्याच्या या प्रखर तेजाची त्याच्या पुत्राला नजर लागू नये म्हणून या पृथ्वीवरील कोण्या शिल्प सोनाराने त्याच्या दंडात खंडोबाचा टाक बांधला तर त्याच्या उत्तुंग शिखरावर कळसुबाई चे देऊळ उभे केले. याच सह्याद्रीच्या अजिंक्य सुळक्यांना, शिखरांच्या चहुबाजूंनी तटा – बुरुजांचे चिलखत घातले. देवगिरीसारख्या वेरूळ, अजिंठाच्या परिसरातील सह्याद्रीच्या रांगेला भक्कम अशा तटाबुरुजांचे पोशाख चढवलेल्या भुईकोट किल्ल्यांनाही चहुबाजूंनी खंदक, मध्येच अंधारी वाट आणि किल्ल्याच्या रक्षणार्थ ती कराल दाढेची ‘मेंढे की तोफ’ सज्ज केली. या देवगिरीवर राज्य होते रामदेवरायाचे, आणि त्याचा पराक्रमी पुत्र शंकरदेवरायाचे. परंतु अल्लाउद्दीन खिलजीने “दीन दीन” करीत येऊन गफलतीत बसलेल्या रामदेवरायाचा पराभव केला. देवगिरीचे नाव बदलले गेले. दौलताबाद पडले. ऐशा अभेद्य किल्ल्यांचा पाडाव झाल्यावर हे हिरवे विष दक्षिणेकडे पसरू लागले. परंतु त्यानंतर या हिरव्या विषाला अडवून धरले ते सूर्यपुत्र सह्याद्रीने. सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारा प्रत्येक गडकोट अभिमानाने छाती फुगवून “हिंदवी स्वराज्य आम्ही कसे राखले” हे सांगतो आहे. किल्ले तोरणा गर्वाने म्हणतो आहे,...
...