भगवान श्रीरामकृष्ण यांचे उपदेश सार्वजनीन स्वरूपाचे असून त्यांत मानवी जीवनाचे अंतिम ध्येय काय आणि ते ध्येय गाठून जीवन सफल व कृतार्थ करून घेण्यासाठी मानवाने काय केले पाहिजे याचे अत्यंत व्यवहार्य असे मार्गदर्शन आढळते. त्यांच्या दिव्य जीवनाच्या व अमृतमय उपदेशांच्या परिशीलनाने हृदयाला अपार शांती लाभते. सर्वसामान्य वाचकांना हा लाभ घेता यावा म्हणून श्रीरामकृष्ण मठ, मद्रास, यांनी ‘Thus Spake Sri Ramakrishna’ या नावाने श्रीरामकृष्णांच्या काही निवडक उपदेशांचे संकलन प्रसिद्ध केले होते. प्रस्तुत पुस्तक त्याचाच मराठी अनुवाद आहे.